लासलगावी संत गुरु रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…! मन चंगा तो कठोती मे गंगा…!
मन चंगा तो कठोंती मे गंगा…!
लासलगाव : संत गुरु रविदास महाराज यांची जयंती संत रोहिदास महाराज चर्मकार बहुउद्देशीय संस्था मर्यादित. लासलगाव त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरु रविदास महाराजांनी म्हटले होते कि, ऐसा चाहू राज मै जहा मिले सबन को अन्न छोट बडो सम बैसे रविदास रहे प्रसन्न…! याच म्हणी प्रमाणे या पृथ्वीतलावरील प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे प्रत्येक जण समाधानी झाला पाहिजे प्रत्येक माणूस समाधानी असला पाहिजे. गुरु रविदास महाराज हे समता बंधुता मानवतावादी व विज्ञानवादी विचारांचे संत म्हणून गुरु रविदास महाराज यांच्याकडे पाहिलं जातं गेली सहाशे एकोणपन्नास वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले जे विचार आहेत ते आजही जिवंत ठेवण्याचे काम समाजाने केलं आहे आणि प्रत्येक घराघरांमध्ये हे विचार पोहोचले पाहिजेत याच्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५३ मध्ये दिल्ली येथे गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी केली होती आणि या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु रविदास महाराज यांना अनटचेबल हा महत्त्वाचा ग्रंथ गुरु रविदास महाराज यांना अर्पण केला, क्रांतिकारी मानवतावादी विज्ञानवादी विचारवंत गुरु रविदास महाराज यांचे विचार आजही एक प्रेरणादायी विचार म्हणून समाजामध्ये ठाम आहेत जातीयवादाच्या विरोधामध्ये त्यांनी ठोस पावले उचलली आणि समाजामध्ये एकता निर्माण व्हावी यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले.
जाति जाति में जाति है, जो केतन के पात, रैदास मनुष ना जुड सके जब तक जाति न जात…! याचप्रमाणे माणूस देखील जातीजातीमध्ये वाटला गेला आहे आणि जातीमध्ये वाटल्यामुळे एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होत आहेत आणि त्यासाठी माणसाने जाती-जातीमध्ये न वाटता एक मनुष्य हीच जात आहे असे गुरु रविदास महाराज यांनी सांगितले आहे .
लासलगाव शहरातील संजय नगर भागामध्ये भव्य असे स्टेजवर संत रोहिदास महाराज यांचे मोठे कट आउट व प्रतिमा लावून प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी बालेश जाधव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, साहेबराव खलसे बीजेपी मंडळ,जगन प्रकाश शेलार, देविदास रवींद्र पवार,शरद पवार,किरण पवार ज्ञानेश्वर नेटारे,राहुल जिरे, पंडित वाघ,अशोक वाघ,मुकुंदराज तेलंगे,सुनील आशांन,बापू गुठळे,राजू प्रकाश शेलार, खंडू जिरे, शिवाजी खैरनार,रामा पाथरे,मुक्तार मणियार, फिरोज शहा, पापा मुलानी, आदिंसह बहुसंख्य महिला व समाज बांधव उपस्थित होते