बदलत्या वातावरणात लहान मुलांची काळजी घ्यावी.. बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक जंजाळे यांनी केले आवाहन

सध्या चैत्र महिन्यातील उष्ण व अतिशय ढगाळ असणाऱ्या
वातावरणातील बदलामुळे …..
बिगर मोसमी वारे…..पावसामुळे लहान मुलांना सर्दी, ताप येणे उन्हामुळे जुलाब , उलटी होऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे बाळ अस्वस्थ होऊन शांत होत असते.बाळ
सुस्थ झाल्यावर पालक घाबरून जातात. सर्दी खोकला वेळेत बरा झाला पाहिजे. नाही तर निमोनियाची लक्षण जाणवतात . कावीळ,टायफाईड सारख्या आजार होण्याअगोदर च लहान बालकांना त्याच्या खाण्या पिण्याची काळजी माता पालकांनी घेतली पाहिजे. बाहेरील उघड्यावरील तेलकट मसाले दार अन्न,पदार्थ कुरकुरीत, गारेगार, पेप्सी आईस्क्रीम थंड पदार्थ टाळून घरीच बनवलेले स्वच्छ आहाराचे नियोजन करून उन्हात जाऊ देवू नये. व तशी आवश्यकता असल्यास लग्न समारंभ व इतर ठिकाणी जात असतांना पिण्याचे पाणी स्वच्छ व शुद्ध देण्यासाठी बालकांची
विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन पिंपळगाव बसवंत शहरातील डॉ. जंजाळे मदर ॲन्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक जंजाळे यांनी केले आहे.
नवप्रभा न्यूज साठी मुकुंद आव्हाड सारोळेथडी