Breaking
ब्रेकिंग

कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे – बाळासाहेब क्षिरसागर.

0 1 0 7 4 3

मुख्य संपादक -महेश साळुंके 

 

लासलगांव, दि. 04  :- किरकोळ बाजारातील कांदा दरावर नियंत्रण ठेवणेसाठी भारतातुन होणाऱ्या कांदा निर्यातीवर केंद्र शासनाने सुरू ठेवलेले 2० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.

यासंदर्भात लासलगांव बाजार समितीच्या वतीने नुकतेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, अर्थ मंत्री निर्मला सितारामन, कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा पवार, कृषि मंत्री माणिकराव कोकाटे व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांना निवेदन देऊन कळविणेत आले की, भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 33 टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव इ. जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा आहे.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा ह्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी लासलगांव बाजार समिती आशिया खंडात प्रसिध्द अशी बाजारपेठ असुन येथे विक्रीस येणाऱ्या एकुण आवकेपैकी 85 ते 90 टक्के आवक ही कांदा ह्या शेतीमालाची असते. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगांव व छत्रपती संभाजी नगर या 05 जिल्ह्यातुन विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी 70 ते 80 टक्के कांदा निर्यातयोग्य असतो.

नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या ह्या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल विक्रीस येतो. माहे डिसेंबर, 2024 मध्ये येथील बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर 6,92,834 क्विंटल पोळ कांदा कमीत कमी रू. 700/-, जास्तीत जास्त रू. 5,641/- व सर्वसाधारण रू. 2,702/- प्रति क्विंटल दराने, माहे जानेवारी, 2025 मध्ये 11,02,439 क्विंटल पोळ कांदा कमीत कमी रू. 1,000/-, जास्तीत जास्त रू. 2,652/- व सर्वसाधारण रू. 2,250/- प्रति क्विंटल दराने, माहे फेब्रुवारी, 2025 मध्ये 7,65,073 क्विंटल पोळ कांदा कमीत कमी रू. 700/-, जास्तीत जास्त रू. 3,535/- व सर्वसाधारण रू. 2,482/- आणि 14,303 क्विंटल उन्हाळ कांदा कमीत कमी रू. 800/-, जास्तीत जास्त रू. 3,152/- व सर्वसाधारण रू. 2,364/- प्रति क्विंटल दराने विक्री झालेला आहे. सद्यस्थितीत येथील बाजार आवारांवर पोळ कांदा कमीत कमी रू. 700/-, जास्तीत जास्त रू. 2,475/- व सर्वसाधारण रू. 2,250/- प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे तर उन्हाळ कांदा कमीत कमी रू. 980/-, जास्तीत जास्त रू. 2,601/- व सर्वसाधारण रू. 2,300/- प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. सदर आवक व बाजारभावाचा विचार करता बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत असुन दिवसेंदिवस बाजारभावात घसरण होत आहे.

चालु वर्षी राज्यात सर्व ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे पोळ / रांगड्या (खरीप) कांद्यासह उन्हाळ (रब्बी) कांदा मोठ्या प्रमाणात बाजार आवारांवर विक्रीस येणार आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत आहे. त्यामुळे कांदा बाजारभावात आणखी घसरण होण्याची दाट शक्यता असल्याने केंद्र शासनाच्या ध्येय-धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होऊन कोणत्याही क्षणी त्यांचेकडुन कांदा लिलावाचे कामकाज बंद पाडुन रस्ता रोको किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत असलेला पोळ / रांगडा व उन्हाळ (रब्बी) कांदा जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात निर्यात होणेसाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर सुरू ठेवलेले 20 टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे अशी मागणी श्री. क्षिरसागर यांनी केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे