Breaking
ब्रेकिंग

लासलगाव शांतता समितीची बैठक संपन्न : रामनवमी व ईद-ए-मिलाद डीजे मुक्त पारंपारिक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प

मी कोणत्या जाती धर्माचा याचा विचार न करता मी लासलगावकर असून गावात शांतता राखण्याची जबाबदारी माझी असल्याचा संकल्प तरुणांनी करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी केले.

0 1 0 7 4 1

लासलगाव : सध्या विविध ठिकाणी घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, बीजेपी चे नेते राजेंद्र चाफेकर, माजी पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे, बीजेपी युवा नेते रवींद्र होळकर, बीजेपी महिला आघाडी सुवर्णा जगताप, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच रामनाथ शेजवळ,माजी सरपंच अफजल शेख, तन्वीर शेख, लासलगाव शहर विकास समितीचे राजाभाऊ कराड, संदीप उगले,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे,पोलीस उप निरीक्षक, भास्कर शिंदे, पीएसआय सुपनर , तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम समाजातील नागरिक, उत्सव समितीचे पदाधिकारी, पोलीस कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद आणि रामनवमी या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. पोलीस उप निरीक्षक भास्कर शिंदे यांनी गावात शांतता टिकवण्यासाठी पोलिसांची भूमिका स्पष्ट केली व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचे प्रमुख साधन ठरत आहे. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी, तसेच मी कोणत्या जाती धर्माचा याचा विचार न करता मी लासलगावकर असून गावात शांतता राखण्याची जबाबदारी माझी असल्याचा संकल्प तरुणांनी करण्याचे आवाहन पोलीस डॉ. निलेश पालवे यांनी केले.

शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे. समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावे, असे मार्केट कमिटीचे संचालक जयदत्त होळकर  यांनी सांगितले. तसेच, समाजात अज्ञानता दूर करण्यावर भर दिला पाहिजे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान योग्य प्रकारे व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बीजेपी महिला आघाडीच्या सुवर्णा जगताप यांनी गावात आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि यापुढेही घडणार नाही, अशी ग्वाही दिली. पोलिसांकडून प्रत्येक सणाला बंदोबस्त ठेवण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले.

गावकऱ्यांनी शांतता समितीच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, रामनवमी उत्सवा  निमित्ताने काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेमध्ये डीजे न वाजवता, 200 टाळकरी व भजनी मंडळी राम नामाचे अभंग गात व पारंपारिक पद्धतीने शोभायात्रा काढणार असल्याचे लासलगाव शहर विकास समितीचे  राजाभाऊ कराड यांनी सांगितले

त्याचबरोबर मुस्लिम समाजाची ईद-ए-मिलाची शोभायात्रा बिना डीजे निघणार असल्याची माहिती मुस्लिम समाजाचे युवा नेते तन्वीर शेख यांनी सांगितले

सण-उत्सव हे सामाजिक सलोख्यात पार पडावेत यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन सर्वसामाजिक घटकांनी  बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकजुटीने शांतता व सुव्यवस्था राखण्याचा संकल्प केला.

1/5 - (1 vote)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे