शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लासलगांव बाजार समितीत मुख्यमंत्री स्वच्छ बाजार आवार अभियान संपन्न – कांतीलाल गायकवाड.

शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लासलगांव बाजार समितीत मुख्यमंत्री स्वच्छ बाजार आवार अभियान संपन्न – कांतीलाल गायकवाड.
लासलगांव :- शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लासलगांव बाजार समितीत आज मुख्यमंत्री स्वच्छ बाजार आवार अभियान संपन्न झाले असल्याची माहिती निफाडचे सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 13 जानेवारी, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये क्षेत्रिय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला असुन सदर कृती आराखड्यांतर्गत संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, गुंतवणुक प्रसार व क्षेत्रिय कार्यालयांना भेटी इ. 7 कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी करणेसाठी संबंधित विभागांना सुचना दिलेल्या आहे. त्यानुसार मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना 7 कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी करणेसाठी सुचना केलेल्या आहे.
सदर सुचनांच्या अनुषंगाने आज (दि. 28 रोजी) लासलगांव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे, ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ थोरे, प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक सहकार अधिकारी भिमा दौंड, नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, दि लासलगांव मर्चन्टस् को-ऑप बँकेचे संचालक किसनराव दराडे, कांदा व्यापारी राजेश मुणोत, राजेश कासट, विलास जगताप, गौरव रेदासनी, रोशन माठा, जिवन पगारे, साईनाथ आबदार, रमेश खोडके, बाजार समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, माथाडी / मापारी कामगार, गाळे धारक यांचेमार्फत मुख्यमंत्री स्वच्छ बाजार आवार अभियान राबविण्यात आले असुन सदर अभियानांतर्गत बाजार समितीच्या सर्व इमारती, प्रवेशद्वार, बाजार आवार, गटारी व प्रसाधन गृह इ. ची साफसफाई करण्यात येऊन दिवसभरात गोळा केलेल्या केरकचरा व पालापाचोळ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती निफाडचे सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांनी दिली.
लासलगांव मुख्य बाजार आवाराप्रमाणेच निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर तसेच खानगांव नजिक, उगांव, नैताळे व मानोरी खुर्द तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर देखील मुख्यमंत्री स्वच्छ बाजार आवार अभियान राबविण्याचा बाजार समितीचा संकल्प असल्याची माहिती सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली