Breaking
ब्रेकिंग

निफाड तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या सक्रिय पाईक श्रीमती सत्यभामा बाई सखाराम शिंदे यांचे दुःखद निधन

0 1 0 7 4 2

 

रुई :- निफाडच्या पूर्व भागांतील गाजरवाडी व रुई येथील रहिवासी श्रीमती सत्यभामाबाई सखाराम शिंदे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले श्रीमती सत्यभामाबाई शिंदे यांनी शेतकरी संघटनेचे पंचप्राण व संस्थापक माननीय शरद चंद्रजी जोशी साहेब यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांकरिता विज जोडो आंदोलन तसेच बँक बेकायदेशीर कर्ज वसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांकरिता असलेल्या विविध सुलतानी व बेकायदेशीर वसुलीच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांना कांदे करता हमीभाव मिळावा व इतर शेतमालाला हमीभाव करता वेळोवेळी आंदोलन करण्यात आले आहेत या आंदोलनामध्ये सौ सत्यभामाबाई शिंदे यांनी शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे पाईक म्हणून वेळोवेळी आंदोलने केली त्यात 1990 सालामध्ये शेतकऱ्यांना कांदे करता हमीभावाने खरेदी करण्याकरिता झालेल्या आंदोलनामध्ये त्यांना दोन दिवस तुरुंगाची हवा खावी लागली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मोसम मध्ये आलेल्या पिकांकरिता पाणी गरजेचे असताना महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने शेतकऱ्यांची थकबाकी असलेले वीज पंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला त्यावेळेस सात गावांकरता वीजपुरवठा खंडित झाला होता तो सुरवात करण्याकरता रुईकर यांच्या शेतकरी संघटनेचे पाईक असलेले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासोबत रुई खेडले झुंगे धारणगाव सारोळा या चौफुलीवर वीज मंडळाच्या आलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांना घेराव घालून आंदोलन केले त्यावेळेस वीज जोडनि करण्यास पूर्ववत करण्यास भाग पाडले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकरिता बँक अधिकाऱ्यांनी देवगाव येथील चोपडे नामक व्यक्तीच्या शेतकऱ्याकडे बँकेने कर्ज वसुली करता शेतजमीन जप्ती केली होती सदर जप्तीची लिलाव बँक करीत असताना सदर शेतकरी संघटनेचे महिला भगिनी सौ सत्यभामाबाई शिंदे यांनी शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा त्यांच्यापुढे मांडली त्यावेळेस बँक कर्मचारी व अधिकारी कोणत्याही परिस्थितीत लिलाव स्थगित करण्यास नकार देत होते त्यावेळेस शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर जप्ती लिलाव प्रक्रिया बंद पाडली व शेतकऱ्यांचा होणारा जमिनीचा लिलाव हा थांबविण्यात आला यावेळेस सदर आंदोलनामध्ये सत्यभामाबाई शिंदे या सक्रिय होत्या तसेच त्यांचे शिक्षण कोणत्याही प्रकारचे नव्हते परंतु शरद जोशींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांकरिता आंदोलने केली तसेच शेतकऱ्यांकरिता तुरुंगवासही भोगला व कोर्टकचेऱ्यांमध्ये वेळ कायमस्वरूपी शेतकऱ्यांना न्याय मिळणे करता झटत राहिल्या तसेच शेतकऱ्यांच्या होणारे नुकसानीचे पंचनामे त्वरित होणे कामे त्यांनी दोन वेळेस आंदोलन केली होती तसेच शेतकऱ्यांकरिता दूरदृष्टी ठेवून कोणत्याही निवडणुकीत स्वतः निवडणूक लढवत नव्हत्या परंतु गावातील ग्रामस्थांनी सहकारी संस्थेत त्यांना दोन वेळेस बिनविरोध महिला संचालक म्हणून निवडून दिले व ग्रामपंचायतीस एक वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले सदर महिला पाईप यांनी कोणत्याही प्रकारची लाच ही कधी स्वीकारली नाही व कोणाला लाचही दिली नाही अशा या करारी बाणेच्या व
समस्त रुईकरांचे भूषण शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय स्व. शरद जोशी साहेब यांच्या खांद्याला खांदा लाऊन शेतकरी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभागी होऊन भल्याभल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घाम फोडणार्या वेळप्रसंगी आंदोलनं करताना जेलची हवा खाणाऱ्या रुई गावच्या वाघीण सत्यभामाबाई शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या जाण्याने निश्चितच त्यांच्या कुटुंबासोबत शेतकरी संघटनेच्या चळवळीची मोठी हानी झाली असून संपूर्ण ग्रामस्थ आणि शेतकरी संघटना त्यांच्या दुःखात सहभागी आहे
त्यांचे पश्चात चार मुले व सुना नातवंडे आहेत

5/5 - (1 vote)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे