Breaking
ब्रेकिंग

आरओ प्लांटचे पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह.. राष्ट्रीय भूजल सर्वेक्षण आणि अन्न व औषधी विभाग कारवाई करणार का..?

लासलगाव विंचूर सह ग्रामीणभागामध्ये अनधिकृत आरो प्लांट चा सुळसुळाट

0 1 0 7 4 2

मुख्य संपादक -महेश साळुंके

लग्नांमध्ये वापरले जाणारे जार चे पाणी मशीनमध्ये

थंड न करता इथलीन ग्लायकॉल सारखा पदार्थ पाण्यात टाकून पाण्याचा फ्रीझिंग पॉईंट डाऊनv करून पाणी त्वरित थंड करण्यात येते तेच पाणी लग्नांमध्ये व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येते त्याच्यापासून लोकांना उलटी मळमळ, किडनीचे आजार, हृदयाचे आजार असे गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे तरी सर्वांनी आपले पिण्याचे पाणी नियमित सोबतच असू द्यावे प्रत्येक थंड पाणी हे मशीनद्वारे थंड केले जातेच असे नाही सध्या केमिकलचा वापर भरपूर प्रमाणात सर्व ठिकाणी होत आहे.

निफाड तालुक्यातील विशेष म्हणजे लासलगाव विंचूरसह ४८गावातील बहुतांश नागरिक आरोग्यासाठी आरओ प्लांटचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. नियमानुसार दर ६ महिन्यांनी पाण्याची शुद्धता तपासणे आवश्यक आहे. हे काम राष्ट्रीय भूजल सर्वेक्षण आणि अन्न व औषध विभागाचे आहे. मात्र, निफाड तालुक्यासह विंचूर लासलगाव परिसरातील ४८गावांमध्ये ही तपासणी होत नसून गावागावात गल्लीबोळात कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत प्लांट उभारण्यात आले असल्याची चर्चा असून . त्या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

तालुक्यात आरो प्लांट हे  रजिस्टर प्लांट आहेत का? यावर प्रश्नचिन्ह असताना मात्र लासलगाव विंचूर सह ४८ गावांमध्ये जार आणि बाटल्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवले जात आहे. त्यामुळे महिन्याला लाखो रुपया पेक्षा अधिकचा व्यवसाय होत आहे. याठिकाणी लहान मुले आणि वृद्धांसह सर्वजण चांगले आरोग्य राखण्यासाठी या पाण्याचे सेवन करत आहेत. मात्र, हे पाणी शरिरासाठी किती शुद्ध आणि फायदेशीर आहे, याचा शोध घेतला जात नाही. पाणी तपासणीच्या प्रश्नाकडे संबंधित विभाग सातत्याने दुर्लक्ष करत असून आरओ प्लांट मालकही पाण्याच्या शुद्धतेकडे गांभीयनि पाहत नाहीत. काही नागरिक थंड पाणी पाहूनच डबा खरेदी करतात, मात्र, आरोग्याबाबत गंभीर नसल्याची परिस्थितीत दिसून येत आहे.

शहरात १० ते २० रुपयांत पाण्याची कॅन
ग्रामीण भागात २० ते ३० रुपयांच्या दराने प्रती कॅन पाणी विकले जात आहे. एका कॅनमध्ये १८ लिटर पाणी शुद्ध पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय वाढत आहे, अशा परिस्थितीत आता आरो प्लांटचे पाणी प्रत्येक घरात वापरले जाऊ लागले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, परंतु संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.

5/5 - (1 vote)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे