Breaking
ब्रेकिंग

देश बदलण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात -डॉ. प्रतापराव दिघावकर जय किसान फोरम तर्फे ३८ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान

0 1 0 7 4 2

 

नाशिक:-शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून शेतकरी असंख्य अडचणींवर मात करतो. देश बदलण्याची ताकद ही शेतकऱ्यात आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलिस महासंचालक डॉ. प्रताप दिघावकर यांनी केले.

भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त जय किसान फार्मर्स फोरम तर्फे रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे झालेल्या कृषी गौरव पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे होते. कार्यक्रमाला मा. जि.प. सदस्य गोरकभाऊ बोडके, डॉक्टर किसानचे डॉ.
सुनिल दिंडे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर, इफकोच्या साधनाताई जाधव, बापूसाहेब शिंदे, पांडुरंग चव्हाण, राजेंद्र गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होते.

कृषी शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांनी शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि पंजाबरावांचे कार्य याबद्दल मार्गदर्शन केले. प्रारंभी जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्य आणि उपक्रमाबद्दल माहिती दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये शिवाजी डांगळे, भारती निरगुडे, विकास निखाडे, अतिशकुमार वाढोरे, प्रदीप मुळीक, संतोष जाधव, सुवर्णा आवारे, सुनिल शिंदे, सतिश म्हसकर, सुमीत धारराव, सुरेश घुगे, श्वेता पवार, मयुर शिंदे, रोहिदास पाटील, मॉ जगदंबा शेतकरी गट, किरण दुकळे, गीता पवार, दत्तात्रय शेरकर, निलेश बागुल, भरत चौधरी, नितीन शेवाळे, निता गाडेकर, गिरीष गावित, सुरेश नाठे, उषा भदाणे, अशोक मार्कंड, मधुरा ढिकले,
रघुनाथ महाजन, दिलीप कुंवर, राहुल गाढवे, अर्चना दिघे, तुळशीराम देशमुख, डॉ. ऋषीकेश सोमण, शशिकांत मंगळे, संपत सानप, देविदास गायकवाड, नामदेव देवरे, सागर निकाळे यांचा समावेश होता.

यावेळी सेंद्रिय शेतीवर चर्चा सत्र, आमची माती आमची माणसं शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन झाले. प्रसिध्द गायिका सुखदा महाजन यांनी सुमधूर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रसिध्द निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असे आवाहन गोपीनाथ लामखडे, गोरक्षनाथ जाधव, भगवान खरे, निवृत्ती न्याहारकर( वाहेगव साळ),मयुर गऊल, सविता जाधव, शाम गोसावी, संतोष केदारे, प्रशांत दिंडे, बाळासाहेब मते, अशोक देशमुख,आसिफ पठाण (लासलगाव) ,सागर रहाणे, सुयोग जाधव, स्नेहल लामखेडे, सुनिल गमे, हेमंत शिंदे, स्नेहल लामखडे, शकील मणियार, दीपक खोडे, ठेंगेसाहेब आदींनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे