कचरा संकलनासाठी खरेदीकेलेल्या ५ ई-बाईकचा लोकार्पन सोहळा संपन्न.. नागरीकांनी उघड्यावर कचरा टाकु नये – सरपंच योगिता पाटील

मुख्य संपादक – महेश साळुंके
ओला व सुका कचरा विलगीकरण करुन घेण्यासाठी ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ५ ई-बाईक चा आज सरपंच योगिता पाटील आणि उपसरपंच रामनाथ शेजवळ यांच्या हस्ते लोकार्पन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच यावेळी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा व सामान्य प्रशासनाचे कामकाज डिजीटल स्वरुपात होण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन संगणक संच, प्रिंटरची पुजन करुन संबंधित विभागाला सुपुर्त करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अफजल शेख, रोहीत पाटील, अमिता ब्रम्हेचा, पुष्पा अहिरे, कॉंग्रेस पक्षाचे सहनियंत्रण समितीचे जिल्हा अध्यक्ष गुणवंत होळकर, योगेश पाटील, सोयेल मोमीन, सुर्यकांत जंगम, ग्रामपंचायत अधिकारी एल.जे.जंगम आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरीक मोठ्या उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे निवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब गिते आणि उपाध्यक्ष तानाजी जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ५.० मध्ये सहभाग घेतलेला असल्याने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा न केल्यास आणि उघड्यावर कचरा टाकल्यास ५००० चा दंड आकारण्यात येणार असल्याचे फलक सार्वजनिक ठिकाणी , उघड्या प्लॉटवर लावण्यात आलेले आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकल वापराच्या प्लास्टीक व कागदी वस्तुंविरोधात कारवाई सुरु केलेली आहे.
ग्रामपंचायत लासलगांवने माझी वसुंधरा अंतर्गत काम करत असतांना घनकचरा व्यवस्थापन आणि राष्ट्रीय संपत्ती पेट्रोल व डिझेल (इंधन) चा वापर कमी प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. नागरीकांनी मोठ्याप्रमाणावर प्रमाणावर ई-बाईकचा वापर करुन राष्ट्रीय संपत्ती इंधनाचा वापर टाळला पाहीजे. लासलगावमध्ये ई-बाईकचा वापर करणे पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठीही चांगले आहे, तसेच सरकारनेही ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे ई-बाईक खरेदी करणे अधिक सोयीचे होत आहे.
कचऱ्याची शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी शासन स्तरावरुन वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेल्या ई-बाईक ने रहीवाशांकडुन कचरा संकलन करतांना ओला व सुका असा विलगीकरण करुनच घेण्यात येणार आहे. ज्या भागात ट्रॅक्टरने कचरा संकलीत करणे अवघड होते आता त्या भागातील कचरा संकलन करण्यासाठी ई-बाईकमुळे सोयीस्कर होणार आहे.
तसेच ई-बाईक वापरामुळे प्रदूषण कमी होणार आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या इंधनाची बचत होते. यांसारखे अनेक फायदे होणार असल्याने कचरा संकलन करण्यासाठी इतर वाहनांची निवड न करता ई-बाईकचा पर्याय निवडण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या विविध योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या गटविकास अधिकारी तुकाराम जाधव व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल पाटील यांनी ग्रामपंचायत लासलगांव ने खरेदी केलेल्या ई-बाईकची पहाणी केली. यावेळी त्यांनी खरेदी केलेल्या ई-बाईकबाबत कौतुक केले आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सर्वांनी ई-बाईकचा वापर करणे गरजेचे आहे. याची सुरवात ग्रामपंचायत लासलगांवने केली आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.