भारतमाता बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने चहा विक्री व्यावसायिकांना काचेचे ग्लासचे वाटप प्लास्टिक ग्लास आरोग्यासाठी हानिकारक असल्याने त्यांचा वापर टाळा
शरद लोहकरे,लासलगाव
दरवर्षी वेगवेगळे नाविण्य उपक्रम राबविणे, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यांसारखे लोकोपयोगी कामकाज करणारी भारतमाता बहुउद्देशीय संस्थेने आगळीवेगळी ओळख मिळविलेली आहे. भारतमाता संस्था लासलगांव व परिसरामध्ये नेहमीच समाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. यावर्षी प्लास्टीक व कागदी ग्लासमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने संस्थेच्या माध्यमातुन हॉटेल, चहाची टपरी आदींसह छोट्या-मोठ्या खाद्यपेय विक्री करणाऱ्या ठेल्यांवर प्लास्टीक, कागदी ग्लास, प्लेट, वाट्यांचा वापर करुन नये अशी जनजागृती करण्यात आली. प्लास्टीक ग्लासचा वापर केल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आसल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने या संस्थेने येथील चहा विक्री करणाऱ्या हॉटेल, हातगाडे वरील व्यावसायिकांना एक-एक डझन काचेचे ग्लासचे वाटप करुन यापुढे कागदी, प्लास्टीक किंवा अशा वस्तुंमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल असे साहीत्य न वापरण्याचे आवाहन केले आहे.
या कॅन्सरच्या आजारापासुन मानवी जीवनाला होणारा धोका टाळण्यासाठी लासलगाव येथे भारतमाता बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने प्लास्टिक कप हद्दपार करण्याच्या उद्देशाने लासलगावातील चहा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना प्रातीनिधीक स्वरुपामध्ये काचेचे ग्लास सप्रेम भेट देण्यात आले. यावेळी उपस्थित नागरीकांना डॉ.अमोल शेजवळ यांनी प्लास्टिकच्या कपचा वापर का टाळावा यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून दोन ना प्लास्टिकचा वापर व त्याचे होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करुन आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. विलास कांगणे यांनी भारतमाता संस्था राबवत असलेला उपक्रम अतिशय उत्कृष्ट व कौतुकास पात्र ठरणारा आहे. या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद लोहकरे, त्यांचे सहकारी बाबासाहेब गिते, अमृत डोमाडे, तानाजी जगताप, अमोल काळे या सर्व टीमने व्यावसायीकांना काचेचे क्लास सप्रेम भेट देऊन “प्लास्टिकचे कप वापर करणे टाळा “तसेच प्लास्टिक कपांचा वापराचे तोटे व कायदेशीर बाबी समजावून सांगत प्लास्टिक कपांचा वापर टाळण्याचा संदेश देत, एक अभिनव उपक्रम भारत माता संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. प्रसंगी योगेश पाटील तानाजी थेटे, दीपक परदेशी, मंजू ठोंबरे, सचिन वाघ,प्रताप जगताप, अनिल भावसार, शशिकांत वाघ, विनोद भुतडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
******************
चौकट
धावपळीच्या आणि गतीमान मानवी जीवनामध्ये कळत न कळत मोठ्याप्रमाणावर प्लास्टिकचा वापर केता जातो. यामध्ये खाण्यापिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकचा मोठा हिस्सा आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार चहासाठी प्लास्टिकचे ग्लास वापरणे आरोग्यास धोकादायक ठरले असुनही बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक ग्लासचा व प्लास्टिक वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनात होताना दिसून येतो. खाद्य पदार्थ खातांना मोठ्याप्रमाणावर प्लास्टीक शरीरामध्ये जावुन त्यापासुन कॅन्सरसारखा भयानक आणि आर्थिक खर्चास न परवडणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. तरी प्लास्टिकचा वापर टाळावा. तसेच ग्रामीण भागामध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती करण्यासाठी ” कॅन्सरला बसावा आळा, म्हणून प्लास्टिकचा वापर टाळा” ही संकल्पना साकारण्यासाठी पुढे यावे.
श्री.शरद लोहकरे
अध्यक्ष: भारत माता बहुउद्देशीय विकास संस्था,लासलगाव